साखर निर्यातीस ५०० रुपये अनुदान द्यावे : हर्षवर्धन पाटील

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नीरा नरसिंहपूर, जि. पुणे ः ‘‘साखरेच्या दर घसरणीमुळे साखर कारखान-दारीसमोर मोठ्या अडचणी उभारल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारने पन्नास लाख टन साखर निर्यातीस परवानगी देऊन प्रतिटन ५०० रुपयांचे अनुदान द्यावे. त्या संदर्भात पुण्यात २९ डिसेंबरला कारखानदारांची बैठक बोलाविण्यात आली आहे,’’ अशी माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

गणेशवाडी (ता. इंदापूर) येथे कार्यकर्त्यांच्या भेटीवेळी पाटील पत्रकारांशी बोलत होते. या वेळी उदयसिंह पाटील, अमर पाटील, मनोज पाटील, विकास पाटील, अंकुश घाडगे, चाँद सय्यद, तुकाराम घोगरे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘राज्यात चालू गाळप हंगामातील दोन महिन्यांचा कालावधी संपत आला आहे. पण, कारखानदारी पुढील संकटाची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. राज्यातील सर्वच कारखान्यांनी २२०० ते ३००० रुपयांपर्यंत पहिली उचल जाहीर केली आहे; परंतु बाजारपेठेत साखरेच्या दराची घसरण सुरू आहे. आज साखरेचे दर ३००० रुपयांवर आल्याने कारखानदारीपुढे मोठे संकट उभा ठाकले आहे.

‘यूपीए’ सरकारच्या काळात २००७ आणि २०१० मध्ये कारखान्यांना ‘बफर स्टॉक’ करण्याची परवानगी होती. आताही सरकारने ‘बफर स्टॉक’ची परवानगी द्यावी, असेही  हर्षवर्धन पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com