साताऱ्यातील धरणांत ८० टक्के पाणीसाठा

साताऱ्यातील धरणांत ८० टक्के पाणीसाठा
साताऱ्यातील धरणांत ८० टक्के पाणीसाठा

सातारा ः जिल्ह्यातील उरमोडी व धोम-बलकवडी धरणांचा अपवाद वगळता, इतर प्रमुख धरणांत ८० टक्‍क्‍यांवर उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नसला, तरी धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणात पाणीस्थिती चांगली आहे.

जिल्ह्यात धरण क्षेत्रात दमदार झालेल्या पावसामुळे या वर्षी धरणे लवकर भरली होती. पाणीसाठा नियंत्रित राहावा यासाठी सर्वच धरणांतून कमी आधिक स्वरूपात पाणी सोडावे लागले होते. या पावसाळ्यात जुलै, ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस झाल्याने या काळात सर्वाधिक पाणी धरणात जमा होते. वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या वर्षी पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी धरणातून अनेक वेळा पाणी सोडले होते. सध्या या धरणात ८५.६७ टक्के पाणीसाठा आहे. पाणीसाठा मुबलक असल्याने वीजनिर्मितीसह शेतीसाठी फायदेशीर ठरणार आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांच्या दुष्टीने महत्त्व असलेल्या उरमोडी धरणात ७९.६० टक्के पाणी उपलब्ध आहे.

प्रमुख धरणाच्या क्षेत्रात दमदार पाऊस झाला असला, तरी जिल्ह्याच्या इतर भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. परिणामी खरिपातील पिकावर झाला. अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने आतापासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. भविष्यात या तालुक्यात पाणीटंचाई होणार असल्याने आतापासून धरणातील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com