पुणतांब्यात शेतकऱ्यांनी घातले सरकारचे वर्षश्राद्ध

पुणतांबे आंदोलन
पुणतांबे आंदोलन

पुणतांबे, जि. नगर  ः शेतकरी संपाला आज एक वर्ष पूर्ण झाले; परंतु तरीही सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही. याचा निषेध म्हणून शुक्रवारी (ता.१) पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येऊन सरकारचे वर्षश्राद्ध घातले. श्राद्धाच्या ठिकाणी काळ्या गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. 

शेतकरी संपाची कल्पना पुणतांबे गावाने मांडली. राज्यातील शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला. सरकारने खोटी अाश्वासने देऊन संप मोडीत काढला. आज पाण्याला जास्त भाव आहे; परंतु दुधाला कवडीमोल भाव मिळत आहे. शेतीमालाला भाव नाही म्हणून शेतकरी हतबल झाले आहेत. तरीही या सरकारला जाग येत नाही म्हणून शुक्रवारी एक वर्षानंतर संपाचे स्मरण करून आम्ही सरकारचे वर्षश्राद्ध घालीत आहोत, असे सरपंच डाॅ. धनंजय धनवटे यांनी सांगितले.

सरकारने शेतकरी प्रश्नांत लक्ष घातले नाही, तर शेतकरी मतपेटीतून आपली ताकद दाखवून देतील, असे बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले. बाळासाहेब भोरकडे, दत्ता धनवटे, अभय चव्हाण, अशोक बोरबणे, रवींद्र धोर्डे, नामदेव धनवटे आदींनी आपल्या भाषणातून सरकारवर हल्लाबोल केला व हा लढा तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. नारायन बोरबणे, राहुल धनवटे, अभय चव्हाण, बाळासाहेब चव्हाण आदींनी गुढीचे पूजन केले. सरकारने वर्षभर शेतकऱ्यांना आश्वसनांचे गाजर दाखविले, असे म्हणत शेतकऱ्यांनी वर्षश्राद्ध प्रसाद म्हणून उपस्थितांना गाजरे वाटली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com