आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन स्थगित

आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन स्थगित
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन स्थगित

पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने आमदार बच्चू कडू यांनी पीकविमा आंदोलन तूर्त मागे घेतले आहे. पीक विम्याचा राज्य हिस्सा म्हणून विविध कंपन्यांना राज्याच्या तिजोरीतून २८४ कोटी रुपये दिले जाणार आहेत.  

पंतप्रधान फळ पीकविमा योजनेतील गेल्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही. नगरमधील शेतकऱ्यांनी मात्र याबाबत पाठपुरावा सुरू केल्यानंतर ‘प्रहार’च्या शेती व उद्योग आघाडीचे प्रमुख अभिजित पोटे यांच्या माध्यमातून ही समस्या आमदार कडू यांच्यापर्यंत पोचविण्यात आली होती.  “कृषी विभागाने निश्चित किती शेतकरी व किती तालुक्यांमध्ये भरपाईपासून वंचित आहेत याची माहिती आम्हाला दिलेली नाही. मात्र, नगर भागातील किमान ४० कोटींची भरपाई अडकून पडल्याची प्राथमिक माहिती आहे. आश्वासनाप्रमाणे २० जूनपर्यंत भरपाई न मिळाल्यास जुलैत मात्र आंदोलन केले जाईल,” अशी माहिती ‘प्रहार’च्या सूत्रांनी दिली.  कृषी विभागाने ‘प्रहार’ला दिलेल्या लेखी माहितीत नगर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा उल्लेख केला आहे. डाळिंब, मोसंबी, चिकू फळपिकांसाठी मृग बहारात शेतकऱ्यांचा विमा हप्ता शेवगाव शाखेकडून विमा कंपनीकडे उशिरा दिला गेला. शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊन पाठपुराव्यानंतर योजनेत पुन्हा समावेश करण्यात आला आहे. आता राज्य शासनाकडे देखील अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे, असे कृषी खात्याचे म्हणणे आहे.  केंद्राचा अनुदान हिस्सा मिळाल्यानंतर विमा कंपनीकडून पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात भरपाई जमा करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिलेल्या आहेत. त्यामुळे वाट पाहून आंदोलनाचे नियोजन केले जाईल, असेही ‘प्रहार’चे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com