किसान सभेने पाठविली मुख्यमंत्र्यांना तूरडाळ, साखर

शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन

परभणी : अन्य देशांतील शेतीमाल आयात करून देश आणि राज्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकणारे धोरण रद्द करावे, मोझंबिकमधून आयात केलेली तूर आणि पाकिस्तानातून आयात केलेली साखर नागरिकांना नको, ती मुख्यमंत्री आणि सरकारनेच खावी, अशी मागणी करत अखिल भारतीय किसान सभेतर्फे मंगळवारी उपजिल्हाधिकारी संजय कुडेेंटकर यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी तूरडाळ आणि साखर देण्यात आली.

शासकीय खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेला हरभरा आणि तूर सरकार खरेदी करू शकले नाही. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या तुरीला योग्य बाजारभाव मिळत नसताना मोझंबिकमधून तूर आयात करण्यात आली. साखरेचे दर कोसळल्यामुळे कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाची १९१३ कोटींची एफआरपी थकविली आहे.

या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याएेवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी पाकिस्तानातून साखर आयात केली. आपल्या देशातील शेतकऱ्यांपेक्षा भाजप सरकारला इतर देशांतील शेतकऱ्यांची काळजी आहे. त्यामुळे ही तूर आणि साखर नागरिकांना नको ती मुख्यमंत्र्यांनीच खावी, अशी मागणी करत अखिल भारतीय किसान सभेचे विलास बाबर, अशोक साखरे, राजेभाऊ राठोड, सुभाष दिनकर, अरुण कच्छवे, सर्जेराव कच्छवे, माधव जावळे आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी उपजिल्हाधिकारी श्री. कुडेंटकर यांच्याकडे तूरडाळ आणि साखर सुपूर्द केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com