तूर, हरभऱ्याच्या पैशांसाठी लातुरात धरणे आंदोलन

लातूर येथे आंदोलन
लातूर येथे आंदोलन

लातूर  ः शेतकऱ्यांचा शेतीमाल हमीभावात खरेदी केल्यानंतर ७ दिवसांच्या आत पैसे देण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु चार महिने उलटूनही अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. याचा निषेध करीत शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून (ता. ६) येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली तूर आणि हरभरा शासनाने हमीभावाने खरेदी केला होता. त्या वेळी सात दिवसांत पैसे देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पणन महामंडळाकडे आपला शेतीमाल विक्री केला. त्याला आता चार महिने होत आहेत; पण अजूनही पैसे मिळत नाहीत. आजही जिल्ह्यातील ५ हजार ५०० शेतकऱ्यांचे ५० कोटी रुपये शासनाने देणे बाकी आहे. यात तूर उत्पादक १५०० तर हरभरा उत्पादित केलेल्या चार हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

शासनाकडे शेतीमाल देऊन अद्यापही पैसे मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पेरणीनंतर आता मशागत आणि मजुरांना देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पैसे द्यावेत, या मागणीसाठी लातूर बाजार समिती परिसरात पणन महामंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी संघटनेचे लातूर व उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र मोरे, सत्तार पटेल, विजय जाधव, अरुण कुलकर्णी, धर्मराज पाटील, सचिन ढवण यांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com