तूर, हरभऱ्याचे पैसे मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही

लातूर येथे आंदोलन
लातूर येथे आंदोलन

लातूर   ः शासनाच्या खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या तूर व हरभऱ्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. सात दिवसांत पैसे देण्याची शासनाची घोषणा फोल ठरली आहे. चार महिन्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाच्या समोर सोमवारपासून (ता. ६) धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारची रात्र कार्यालयासमोरच काढली. पैसे मिळेपर्यंत धरणे आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार संघटनेने केला असून मंगळवारी (ता. ७) दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच राहिले. आंदोलनात संघटनेचे लातूर व उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र मोरे, सत्तार पटेल, विजय जाधव, अरुण कुलकर्णी, धर्मराज पाटील, सचिन ढवण, गणेश माडजे, बबन चव्हाण, दत्तू टिपे, नवनाथ शिंदे आदी सहभागी झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com