सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चा

सांगली येथे मोर्चा
सांगली येथे मोर्चा

सांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता शासनाच्या नजरेत आणून देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जनावरांसह भर उन्हात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (ता. २०) मोर्चा काढला.

सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनी केले. शासन दुष्काळाबाबत अक्षम्य दुर्लक्ष करीत असून, शासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर दुष्काळी तालुक्याच्या तहसील दार कार्यालयात जनावरे बांधू, असा इशारा या वेळी देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळी भागात काय उपाययोजना करायला हव्यात, याचे निवेदन देण्यात आले.

जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज आदी दुष्काळी जिल्ह्यातील शेतकरी आपले बैल, गाई, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदी जनावरे घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते. आमदार पाटील म्हणाले, शासन तातडीने चारा छावण्या काढणार नसेल, तर त्यांनी पाऊस पडेपर्यंत कर्नाटक राज्याप्रमाणे दावणीला चाऱ्याची व्यवस्था करावी. चारा छावणीत मोठ्या जनावरांना रुपये १२०, तर लहान जनावरांना रुपये ७० रुपयांची, तसेच पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी. शेळ्या मेंढ्यांची प्रत्येक तालुक्यावार वेगळी व्यवस्था करण्यात यावी. पवारसाहेब राज्यात फिरून दुष्काळी जनतेस दिलासा देत असताना, मुख्यमंत्री एसी रूममध्ये बसून आढावा घेत आहेत. त्यांनी बाहेर पडून शेतकरी व जनावरांची हालत बघावी. शेतकरी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com