औरंगाबाद येथे शेतकरी संपाला सुरवात

शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन

औरंगाबाद : येथील क्रांती चौकात किसान क्रांती जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता.१) मशाल पेटवून शेतकरी संपाला सुरुवात केली.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता होण्यासाठी किसान क्रांती जनआंदोलनाने देशभरात शेतकरी संपाची हाक दिली आहे. १ जूनपासून सुरू होणारा हा संप १० जूनपर्यंत चालणार आहे. पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील औरंगाबाद येथे क्रांती चौकात क्रांतीची मशाल पेटवत किसान क्रांती जनआंदोलनचे विजय काकडे पाटील, गजानन पाटील, जी. के. गाडेकर, अमोल सोळंके गणेश सोळंके, महेश गुजर आदी कार्यकर्त्यांनी शेतकरी संपांची हाक दिली.

शेतकऱ्यांच्या या संपाला पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ खुल्ताबाद तालुक्‍यातील गल्लेबोरगाव येथील काही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून आपला शासनाच्या धोरणाप्रती निषेध व्यक्‍त केला. आजपासून (शनिवारी) नियोजनानुसार संपाची धार अधिक तीव्र होईल, अशी माहिती विजय काकडे पाटील यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com