राज्यातील १८० कारखाने गाळप करण्याची शक्यता

चांगला पाऊस आणि उसाची उपलब्धताबघता राज्यात अजून दहा कारखाने गाळपासाठी उतरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे साखर कारखाना उद्योगातील उलाढाल देखील वाढेल,असे जाणकारांचे म्हणणे आहे.
गाळप हंगाम
गाळप हंगाम

पुणे : राज्यात यंदा उसाची उपलब्धता वाढणार असल्यामुळे शासनाच्या आधीच्या अंदाजाप्रमाणे गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. गाळप परवाना ऑनलाइन मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या कारखान्यांची संख्या १७४ पर्यंत पोचली आहे. ही संख्या १८० कारखान्यांच्या आसपास राहू शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मंत्री समितीसमोर मांडलेल्या पहिल्या अंदाजाप्रमाणे राज्यात यंदा १७० साखर कारखाने गाळपासाठी उतरतील असे सांगण्यात आले होते. तथापि, आता स्थिती झपाट्याने बदलत आहे. चांगला पाऊस आणि उसाची उपलब्धता बघता राज्यात अजून दहा कारखाने गाळपासाठी उतरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे साखर कारखाना उद्योगातील उलाढाल देखील वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.  धुराडी पेटवण्याची तयारी केलेल्या कारखान्यांमध्ये आतापर्यंत ९१ सहकारी साखर कारखाने असून ८३ खासगी कारखाने आहेत. गाळपासाठी नव्याने अर्ज करीत असलेल्या साखर कारखान्यांच्या कागदपत्रांची छाननी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडून सुरू आहे.  दुसऱ्या हप्त्याकडे लक्ष ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक याच आठवड्यात राज्याचे मुख्य सचिव घेत आहेत. मंडळाकडून शेतकऱ्यांच्या उसाला दुसरा हप्ता किती जाहीर होतो याकडे साखर कारखाना उद्योगाचे लक्ष लागून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com