नाशिक जिल्ह्यात चार महिन्यांत ३० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून गेल्या चार महिन्यांत ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यात इगतपुरी आणि देवळा तालुक्यांत दोन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. आत्महत्या होणाऱ्या तालुक्यांच्या यादीमध्ये इगतपुरीचा समावेश झाला आहे.

गतवर्षी जिल्ह्यात १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या मोसमात चांगला पाऊस पडूनही यंदा शेतकरी आत्महत्यांच्या घटनेत घट झालेली नाही. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत ३० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे. सोमवारी (३० एप्रिल) रोजी इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे लुखा नामदेव भोर (वय ४५) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

महाराष्ट्रदिनी म्हणजेच मंगळवारी १ मे रोजी कृष्णा भिला सूर्यवंशी (वय ३६) या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले. ते देवळा तालुक्यातील खालप येथील रहिवाशी आहेत. या दोन्ही घटनांचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला बुधवारी प्राप्त झाला. त्यामुळे टंचाई शाखेने या घटनांची नोंद घेतली असून चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३० झाली आहे.

तालुकानिहाय शेतकरी आत्महत्या नाशिक १, बागलाण ४, चांदवड २, सिन्नर ४, देवळा ३, दिंडोरी ४, इगतपुरी १, मालेगाव ४, निफाड ५, येवला २.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com