कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार जोडणी आवश्यक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार जोडणी न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी (ता. २६) केले. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेचा राज्यभरातील आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. 

श्री. देशमुख म्हणाले, कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या छाननीचे काम सध्या सुरू आहे. छाननीची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. यात राज्यातील २ लाख ४१ हजार ६२८ शेतकऱ्यांचे अर्ज आधारशी जोडलेले नसल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नसल्याचे दिसून आले आहे. आधार जोडणी नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचे लाभ नाकारणे योग्य होणार नाही, अशी चर्चा या वेळी झाली. येत्या २ ऑक्टोबरला गावांमध्ये चावडी वाचन होणार आहे.

दरम्यान ज्यांच्याकडे आधार कार्ड आहेत, अशा शेतकऱ्यांनी तालुका पातळीवरील तक्रार निवारण केंद्रात जाऊन कर्जमाफीच्या अर्जाशी आधारची जोडणी करून घ्यावी. ज्यांच्याकडे आधार नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड नव्याने काढून त्याची नोंदणी अर्जासोबत करणे आवश्यक आहे. यासाठी मुदत देण्यात आलेली नाही. मात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही जोडणी करून घेणे गरजेचे आहे. तसेच ६६ कॉलमचा अर्ज भरून देण्याचे बँकांवर बंधन आहे. 

शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्जासोबत सहकार खाते बँकांकडूनही माहिती घेत आहे. जिल्हा बँकांकडून माहिती मिळण्यास विलंब होत आहे. या बँकांनीही लवकर माहिती देण्याचे  निर्देश देशमुख यांनी यावेळी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com