राहुरी कृषी विद्यापीठासाठी आंबा ठरला गोड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

राहुरी, जि. नगर  : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आंबाउत्पादनात यंदा २० ते २५ टक्के घट झाली. मात्र, कमी उत्पादनामुळे आंब्यांचे दर चांगलेच वाढले. परिणामी, उत्पादनात घट होऊनही कृषी विद्यापीठाला आंबाविक्रीतून तब्बल २३ लाख रुपयांचे अधिक उत्पन्न मिळाले.

कृषी विद्यापीठाच्या इतिहासात यंदा प्रथमच आंबालिलावासाठी ‘ई-टेंडरिंग’ झाले. या बदलामुळे लिलावास तीन वेळा मुदतवाढ द्यावी लागली. ही प्रक्रिया २० दिवस उशिरा, म्हणजे १२ मे रोजी पूर्ण झाली. यापूर्वी तोंडी लिलाव होत. मात्र, यंदा शासनाने ‘ई-टेंडरिंग’चा आदेश दिला होता. त्यासाठी नियंत्रक विजय कोते खास आग्रही होते. 

बागवान नव्या बदलास अनुकूल नव्हते. कागदपत्रांची पूर्तता त्यात महत्त्वाची अडचण होती. बैठकीत बागवानांच्या अडचणींवर चर्चा झाली. उपाययोजना केल्यानंतर यंदा बागवानांची संख्या वाढली.

उद्यानविद्या विभागाच्या तीन हजार झाडांना यंदा फळे लागली. लिलावातून २५ लाख २५ हजार रुपये आले. गतवर्षीपेक्षा आठ लाख रुपये तिजोरीत जास्त आले. उत्पादनात २५ टक्के घट झाली. मात्र तरीही तिजोरीत गतवर्षीपेक्षा एकूण २१ बागांतून २३ लाखांची वाढ झाली. - डॉ. शरद रणपिसे, उद्यानविद्या विभागप्रमुख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com