प्रतीक्षा संपली... आजपासून जालन्यात ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जालना : सर्वांना उत्सुकता लागून असेलल्या सकाळ -ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला उद्योग नगरी म्हणून ख्याती असलेल्या जालना शहरात शुक्रवारी (ता.१९) प्रारंभ होत आहे. शेतकऱ्यांसह कृषी उद्योगासाठी हे प्रदर्शन सर्वात पर्वणी ठरणार आहे.

शेतकऱ्यांना शेती व पूरक क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाशी अवगत करत कृषी क्षेत्राला विकासाच्या दिशेने नेण्याच्या दृष्टीने सकाळ - ॲग्रोवनच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून जालन्यात कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया तसेच कृषी विभाग जालना व आत्मा जालना या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. सतत दुसऱ्या वर्षी जालन्यातील आझाद  मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे  दुपारी १ वाजता उद्‌घाटन होणार आहे.

या वेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीष टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, जालन्याचे अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जालन्याचे आत्माचे  प्रकल्प संचालक संतोष आळसे आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

या कृषी प्रदर्शनात आधुनिकतेकडे नेणाऱ्या तंत्रज्ञानाचा आविष्कार शेतकऱ्यांना पहायला मिळणार आहे. अॅग्रोवनचे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्ञान व माहितीचा एकप्रकारे खजिनाच असणार आहे.

प्रदर्शनात या विषयांचा समावेश या प्रदर्शनाच्या माध्यमातून तंत्रज्ञान व कृषीविषयक उत्पादनाच्या माध्यमातील विविध कंपन्या शेतकऱ्यांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये  ट्रॅक्‍टर्स, हार्वेस्टींग यंत्रे, विविध प्रकारची अवजारे व कापणी यंत्र उत्पादक कंपन्या, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाउस टेक्‍नॉलॉजी आणि इंप्लिमेंट्‌स, बियाणे उत्पादक टिश्‍युकल्चर, ठिबक व तुषार सिंचन, पॅकेजिंग, ग्रेडिंग, वेईंग, सोर्टींग अवजारे उत्पादक कंपन्या, बॅंका, कृषी साहित्य प्रकाशन, कृषी संशोधन संस्था, शासनाच्या व कृषी विभागाचे महिला शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, सेंद्रिय शेतकरी गट, नर्सरी आणि कृषी विभागाचे व आत्माचे विविध गट सहभागी होत आहेत.

तीन दिवस चालणार प्रदर्शन यंदा सलग दुसऱ्या वर्षी जालन्यातील नगरपालिकेच्या आझाद मैदानावर १९ ते २१ जानेवारी दरम्यान तीन दिवस हे प्रदर्शन होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान हे प्रदर्शन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे.

अशी असतील चर्चासत्रे

१९ जानेवारी २०१८ पहिले चर्चासत्र : वेळ : दुपारी १२ ते २ विषय : मोसंबी बहाराचे नियोजन वक्‍ते : डॉ. एम. बी. पाटील, प्रमुख फळबाग संशोधन केंद्र हिमायतबाग, औरंगाबाद. दुसरे चर्चासत्र : वेळ : दुपारी ३ ते ५ विषय : रेशीम शेती व्यवस्थापन व संधी वक्‍ते : अजय मोहिते प्रकल्प अधिकारी जिल्हा रेशीम कार्यालय औरंगाबाद.

२० जानेवारी २०१८ पहिले चर्चासत्र : वेळ : दुपारी १२ ते २ विषय : आधुनिक व व्यावसायिक शेळीपालन वक्‍ते : डॉ. श्रीकांत सटाले, पशुवैद्यक औरंगाबाद. दुसरे चर्चासत्र : वेळ : दुपारी ३ ते ५ विषय : बोंड अळीचे संकट, त्यावरील उपाय व कीड नियंत्रण वक्‍ते : डॉ. बी. बी. भोसले, माजी विस्तार शिक्षण संचालक वनामकृवी तथा प्राचार्य कृषी महाविद्यालय लातूर.

२१ जानेवारी २०१८ पहिले चर्चासत्र : वेळ : दुपारी १२ ते २ विषय : मुक्‍त संचार गोठा, मुरघास निर्मिती व दुधाळ जनावर प्रजाती वक्‍ते : श्री. चंद्रशेखर वसंत कुलकर्णी   दुसरे चर्चासत्र : वेळ : दुपारी ३ ते ५ विषय : सेंद्रिय शेतीची गरज -मार्केटिंग व ब्रॅंडिंग व्यवस्थापन वक्‍ते : श्री. हेमंत चव्हाण.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com