उष्ण वातावरणामुळे केळीबागा संकटात

अकोला ः पणज मंडळात उष्णतेमुळे केळीची झाडे अशी वाळली आहेत.
अकोला ः पणज मंडळात उष्णतेमुळे केळीची झाडे अशी वाळली आहेत.

अकोला  ः सतत ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत असल्याने केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. याचा पंचनामा करून पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी अकोट तालुक्‍यातील पणज मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभाग, महसूल यंत्रणा व विमा कंपनीकडे केली आहे. याबाबत संघर्ष शेतकरी बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय, तहसीलदारांमार्फत निवेदन पाठवले. 

याबाबत शेतकऱ्यांनी म्हटले, की हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी पणज मंडळातील शेतकऱ्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत विमा वेळेत जमा केला आहे. या भागात २० एप्रिलपासून आजपर्यंत सतत ४५ अंश तापमान राहत आलेले आहे. या तप्त वातावरणामुळे झाडे पडणे, झाड सुकणे, पाने करपणे, पाने फाटणे, घड कमजोर तयार होणे असे विविध परिणाम झाले आहेत.

याचा फटका उत्पादनावर होणार आहे. शेतकऱ्यांनी या वर्षी मोठ्या मेहनतीने बागा फुलविल्या होता. मात्र हे नुकसान मोठे असल्याने शेतकरी संकटात आले आहेत. त्यामुळे तातडीने कृषी व महसूल यंत्रणांनी पंचनामा करावा व विमा कंपनीने विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती कृषिमंत्र्यांसह संबंधित सर्वांना पाठवण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com