शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निर्णायक पाऊल उचलले आहे. १ मे रोजीच्या ग्रामसभेत ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करणारा ठराव करण्याचे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. 

राज्यातील २० हजार ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार करून खासदार शेट्टी यांनी हे आवाहन केले आहे. शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी खासदार शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी देशपातळीवर शेतकरी संघटनांना अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून एकत्रित केले होते. शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमुक्ती मिळण्याचा अधिकार व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळवून देण्याचा अधिकार विधेयक २०१७ ही दोन विधेयके तयार केली. 

या दोन्ही मसुद्यांवर देशपातळीवर चर्चा घडवून अनेक नामवंत वकील, समाजसेवक, बुद्धिवादी, शेतकरी नेते यांच्याशी चर्चा विनिमय करून अंतिम मसुदा तयार केला आहे. या सर्वांनी एकमुखाने दोन्ही विधेयकांना मान्यता दिली. या विधेयकांना मंजुरी देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची विनंती राष्ट्रपतींना भेटून करण्याचेही ठरले. संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करणारा ठराव करून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांना पाठविण्याचे आवाहन शेट्टी यांनी ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्रात केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com