चाऱ्याचा होतोय कोळसा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला ः अत्यल्प पाऊस, विदर्भ, मराठवाड्यातील कोरडे पडलेले जलसाठे आणि उन्हाचे चटके अशा परिस्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्ध नसताना शेतातून निघणाऱ्या कचऱ्याच्या नावाखाली थेट चाऱ्यापासूनच कोळसा (व्हाइट चारकोल/गट्टू) निर्मिती केली जात आहे. त्यासाठी दररोज हजारो मेट्रिक टन चारा नष्ट केला जात आहे.  दुष्काळी परिस्थितीत नष्ट होत असलेल्या या चाऱ्यामुळे पशुपालकांपुढचा चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. 

अकोल्यात चाऱ्यापासून कोळसा तयार करणारे डझनभर कारखाने सुरू असून, राज्यात तीनशेच्या वर असे कारखाने असल्याची माहिती आहे.राज्यात दगडी कोळशाचा पर्याय म्हणून, व्हाइट चारकोलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. ते तयार करण्यासाठी जनावरांचा चारा वापरला जातो. सोयाबीन, कडबा कुटार चाऱ्याचा सर्वाधिक उपयोग कोळसा निर्मिती करण्यासाठी होत असल्याने जिल्ह्यासह राज्यभरात चाराटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.

याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून आढावा घेतला असता, अकोल्यात जवळपास १० ते १२ कारखाने सुरू असून, रोज १५० मेट्रिक टन चाऱ्यापासून कोळसा निर्मिती येथे होत असल्याची माहिती पुढे आली. एवढेच नव्हे, दुपटीने नफा देणाऱ्या या उद्योगाचे तीनशेहून अधिक कारखाने राज्यात सुरू असल्याने चार ते साडेचार हजार मेट्रिक टन चाऱ्याचा कोळसा (व्हाइट चारकोल/गट्टू) राज्यात होतो अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

४५०० मेट्रिक टन दररोज होणारे व्हाइट चारकोलचे उत्पादन १.२५ कोटी जनावरांचा चारा चारकोलसाठी ४० ते ४५ लाख किलो चारा दररोज नष्ट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com