नगर जिल्ह्यामध्ये ‘जलयुक्त’मधून साडेतीन हजार कामे पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून गेल्यावर्षी (२०१७-१८) निवडलेल्या २४१ गावांत कामे जोमाने सुरू केली आहेत. आतापर्यंत या गावांत तब्बल सात हजार ३६ कामे सुरू झाली असून, त्यातील तीन हजार पाचशे आठ कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत झालेल्या कामांवर ४३ कोटी पेक्षा जास्त खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

नगर जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून मागील वर्षात २४१ गावांची निवड झालेली आहे. या गावांत आराखड्यानुसार आठ हजार नऊशे नऊ कामे मंजुंर आहेत. मागील दोन वर्षांत निवडलेल्या गावांतील कामे पूर्ण केल्यानंतर आता गतवर्षीच्या गावांतील कामे वेगाने करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. 

जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून कामे करण्यावर भर दिला. मागील दोन वर्षांत (२०१५-१६ व २०१६-१७) झालेल्या कामाचे परिणामही आता दिसत आहेत. अभियानात पहिल्या वर्षी २७९, दुसऱ्या वर्षी २५६ गावे निवडली गेली. या दोन वर्षांत जवळपास तीनशे पंचवीस कोटींची पंचवीस हजारांच्या वर कामे केली. लोकसहभाग वाढल्याने कामांना गती आली. या दोन वर्षांतील कामे अजून काही ठिकाणी सुरू आहे. यंदाच्या मार्च अखेरपर्यंत दोन वर्षांतील मंजूर कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते, मात्र कामे झाली नसल्याने ती करण्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे.

गेल्यावर्षी (२०१७-१८) २४१ गावांची निवड केलेली असून या गावांत आठ हजार १३३ कामे मंजूर आहेत. त्याची किंमत तब्बल १९७ कोटी पाच लाख ८९ हजार रुपये आहे. मंजूर कामांपैकी आतापर्यंत एकशे ६८ कोटी रुपयांच्या सात हजार ९६१ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सव्वाशे कोटी रुपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश दिलेले आहेत.  आतापर्यंत तीन हजार पाचशे आठ कामे पूर्ण झाले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com