शेतीप्रश्‍नी काँग्रेस नेत्यांचा आत्मदहनाचा इशारा

शेतीप्रश्‍नी काँग्रेस नेत्यांचा आत्मदहनाचा इशारा
शेतीप्रश्‍नी काँग्रेस नेत्यांचा आत्मदहनाचा इशारा

अमरावती  ः शेती व शेतकऱ्यांशी निगडित प्रश्‍नांची सोडवणूक ३१ मेपर्यंत न केल्यास १ जून रोजी जिल्ह्यातील कााँग्रेसचे नेते आत्मदहन करतील, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप, प्रदेश सचिव संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी हा इशारा दिला.

केंद्र व राज्यातील भाजपप्रणीत सरकारने शेतकऱ्यांचा अनेक आघाड्यांवर विश्‍वासघात केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. खरीप हंगाम तोंडावर असताना तूर खरेदीचे पैसे दिले गेले नाही. गोदामाचे कारण पुढे करून हरभरा व तूर खरेदी रखडत ठेवण्यात आली. त्यासोबतच बोंड अळीच्या मदतीचे वाटपालादेखील अजून सुरवात झाली नाही. तूर खरेदीचे पैसे आणि बोंड अळीची मदत शेतकऱ्यांना मिळाली तर त्यांना बी-बियाण्याकरिता पैसे उपलब्ध होतील. परंतु शासन या संदर्भाने काहीच बोलण्यास तयार नाही, याचा काँग्रेसी नेत्यांनी निषेध केला. 

कर्जमाफीचा बोजवारा उडाला असून, त्यांचा फटका या हंगामात पीककर्ज वाटपाला बसणार आहे. कर्जमाफीसाठीच्या दरदिवशी बदलणाऱ्या परिपत्रकामुळे बॅंकांसमोरील अडचणीतदेखील वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामेदेखील प्रभावित झाल्याचे सांगत कााँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तुरीचे चुकारे त्वरित देणार असल्याचे सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com