‘तुरीचे चुकारे द्या; अन्यथा आंदोलन’

तुर खरेदी केंद्र
तुर खरेदी केंद्र

वाशीम : नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे पैसे मिळत नसल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी बाजार समिती संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत टोकनधारक शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे रखडलेले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत २६ सप्टेंबरला धरणे देण्याचा इशारा दिला आहे.

वाशीम तालुक्‍यातील चार हजार ११२ शेतकऱ्यांची ५६ हजार ६६२ क्विंटल तूर बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत नाफेडने खरेदी केली आहे. याचे २८ कोटी ६१ लाख रुपये चुकाऱ्याचे थकले आहेत. ही रक्कम फक्त वाशीम तालुक्‍यातील असून, जिल्ह्यातील इतर तालुके मिळून कोट्यवधी रुपये शासनाकडून यायचे आहेत.

या हंगामात वाशीम जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट तयार झाले आहे. सोयाबीन, तूर ही पिके संपूर्णतः हातातून गेली आहेत. शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत आलेला आहे. वाशीम तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ९९ टक्के तूर नाफेडने मोजली आहे. मात्र याचा १३ सप्टेंबरपर्यंत एकही रुपया दिला गेलेला नाही.

सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू आहे. ही सोंगणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसून, तुरीचे चुकारे मिळाल्यास फायदा होईल. याची दखल घेत शासनाने २५ सप्टेंबरपर्यंत चुकारे न केल्यास २६ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह धरणे देण्याचा इशारा बाजार समिती संचालक राजू चौधरी यांनी जिल्हा आहे. या संदर्भात पणनमंत्री सुभाष देशमुख, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासह इतरांना निवेदन पाठविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com