शेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार सुरूच राहणार

नगर ः कळस बुद्रुक (ता. अकोले) येथे शेतकरीप्रश्नी केलेल्या रास्ता रोको आंदोलनात मार्गदर्शन करताना डॉ. अजित नवले.
नगर ः कळस बुद्रुक (ता. अकोले) येथे शेतकरीप्रश्नी केलेल्या रास्ता रोको आंदोलनात मार्गदर्शन करताना डॉ. अजित नवले.

नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे असून, केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांचे काहीच घेणे-देणे नाही. जगाचा पोशिंदा बळिराजा अडचणीत आला आहे. दुधाला व शेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार, असा इशारा शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिला.  

कळस बुद्रुक (ता. अकोले) येथे सकाळी ८ वाजता कळस बुद्रुक ग्रामस्थांतर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, सोन्याबापू वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, निवृत्ती मोहिते, अरुण वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, राजेंद्र गवई, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनी कोल्हार घोटी राजमार्ग सुमारे दोन तास अडवून धरीत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध केला. या वेळी कळस बुद्रुक ग्रामस्थांनी आपापली सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेऊन या रास्ता रोको आंदोलनाला पाठिंबा दिला. डॉ. नवले म्हणाले, ‘भाजप सरकारच्या काळात शेतीमालाला बाजारभाव नाही. शेतीला केलेला खर्चसुद्धा फिटत नाही.

त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून, तो आत्महत्या करीत आहे. शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी लढा उभारीत असून, सर्व शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी होऊन ही चळवळ अधिक व्यापक करावी. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटेपर्यंत लढा कायम सुरू राहणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com