शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा शिकवू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र सरकार शेतकरी आणि साखर कारखानदारांची भांडणे लावून रिकामे झाले, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे प्रसंगी शेतकरी आणि कारखानदार एकत्र येऊन सरकारला धडा शिकवू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला. जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासंदर्भातील बैठकीनंतर श्री. शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, ‘‘देशात यंदा २९० लाख टन साखर उत्पादन झाले. यात ४० लाख टन अतिरिक्त साखर झाली आहे. ही साखर तोटा सहन करून निर्यात केल्यास उर्वरित ९० टक्के साखरेला चांगला भाव मिळू शकतो. कृषी मालाला दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे. कर्जमाफीत मोठा घोळ आहे. याकडे केंद्र व राज्य सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले आहे.

अशीच पद्धत शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’बाबत अवलंबिली आहे. कारखानदार व शेतकरी यांच्यात वाद निर्माण करून सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. या भूमिकेत बदल करून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा भविष्यात कारखानदार व शेतकरी सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.’’ 

‘‘यंदाच्या गळीत हंगामात ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे ‘एफआरपी’ अधिक २०० रुपयांवर आजही स्वाभिमानी संघटना ठाम आहे. सरकारने बघ्याची भूमिका बदलली नाही तर मात्र कारखानदार व शेतकरी सरकारला धडा शिकवतील,’’ असा इशारा त्यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com