शेतकऱ्यांनो आता लढायचे ः राजू शेट्टी

शेतकऱ्यांनो आता लढायचे ः राजू शेट्टी
शेतकऱ्यांनो आता लढायचे ः राजू शेट्टी

अर्धापूर, जि. नांदेड (प्रतिनिधी) : सरकारने शेतीविषयी चुकीचे धोरण अवलंबिले. त्यामुळे शेतीमालाचे भाव पडले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी अर्धापूर येथील सभेत मंगळवारी (ता. आठ) केले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मराठवाडा, विदर्भ या दुष्काळी भागातील 14 जिल्ह्यांत शेतकरी सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे अर्धापूर शहरात मंगळवारी सकाळी आगमन झाले. खासदार शेट्टी यांची अर्धापूर शहरात बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मारुती मंदिर परिसरातील मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, मराठवाडाध्यक्ष माणिक कदम, जिल्हाआध्यक्ष प्रल्हाद इंगोले आदी उपस्थित होते. 

खासदार शेट्टी म्हाणाले, की शेतीमालाला उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. पण त्यांनी देशातील शेतकऱ्यांची फसवणूक करून विश्वासघात केला. उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणार भाव यात मोठी तफावत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तसेच पंतप्रधान पीकविमा योजना ही शेतकरी कल्याण योजना नसून, काॅर्पोरेट कंपनी कल्याण योजना आहे. स्वमिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी सन्मान वाढविण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली, असे प्रतिपादन खासदार शेट्टी यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com