शेतकऱ्यांना तुरीची थकबाकी पंधरा दिवसांत ः खोत

शेतकऱ्यांना तुरीची थकबाकी पंधरा दिवसांत ः खोत
शेतकऱ्यांना तुरीची थकबाकी पंधरा दिवसांत ः खोत

मुंबई : यंदाच्या हंगामात राज्य सरकारने हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीचे थकीत सर्व पैसे शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसांत दिले जातील, असे आश्वासन कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी (ता. २६) विधान परिषदेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ख्वाजा बेग यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. 

तूर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे ८३० कोटी रुपये थकीत आहेत. ३२ कोटी ८९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, उरलेले आठशे कोटी रुपये देण्याचे अद्यापही बाकी आहे.

त्यापैकी ५०० कोटी रुपये या आठवड्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले जातील, तर उर्वरित ३०० कोटी रुपये १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होतील, अशी माहिती खोत यांनी या वेळी दिली. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान अमरसिंह पंडित यांनी काही शेतकऱ्यांना तूर खरेदीनंतरही देयके दिली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. याप्रकरणी निश्चित चौकशी केली जाईल, यात दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com