'विमा कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा'

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : खरीप हंगामातील पिकांचे १०० टक्के नुकसान झालेले असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई नाकारणाऱ्या विमा कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.

कमी आणि अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे खरीप पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पूर्ण जोखमीसह विमा परतावा मिळणे अपेक्षित असताना अत्यंत कमी नुकसान भरपाई दिलेली आहे.

जिल्ह्यातील सर्वच मंडळांतील शेतकऱ्यांनी विमा रक्षण घेत असताना विविध पिकांसाठी हेक्टरी समान विमा हप्ता भरला आहे; परंतु विमा परतावा मंजूर करताना रिलायन्स विमा कंपनीने कमी परतावा मंजूर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून विमा कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार जाधव यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com