कर्जमाफीची जिल्हानिहाय माहिती शासनाकडे नाही

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने ४६.५२ लाख शेतकऱ्यांना १४,३८८ कोटी कर्जाचे वाटप केल्याची माहिती अधिकारात सरकारने स्पष्ट केले. मात्र या संदर्भातील जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याचीही कबुली दिली आहे. यामुळे एकूण कर्जवाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती मागितली होती. कर्जमाफीत एकूण शेतकऱ्यांची संख्या, एकूण मंजूर आणि नामंजूर अर्जाची संख्या, बँकेचे नाव, एकूण वाटप निधी याची जिल्हानिहाय माहिती त्यांनी शासनाकडे मागितली होती. यावर सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे जन माहिती अधिकारी दि. म. राणे यांनी एकूण बँकेत जमा केलेल्या निधीच्या रकमेबाबत जिल्हानिहाय माहिती शासन स्तरावर उपलब्ध नाही.

तसेच विदर्भातील गावनिहाय माहितीसुद्धा शासन स्तरावर उपलब्ध नसल्याचे कळवले आहे.  शासनाने दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत  एकूण ३७ जिल्ह्यांतून ५६ लाख ५९ हजार १५९ अर्ज शासनाकडे प्राप्त झाले. यात सर्वाधिक अर्ज अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. नगरमधील संख्या ३ लाख ३४ हजार ९२० इतकी आहे.

तसेच १ हजार ६२० मुंबई उपनगर आणि २३ हजार ७१५ मुंबई शहरातील अर्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी राष्ट्रीयीकृत बँकांतील १९ लाख ८८ हजार २३४ खात्यांवरील कर्जमाफीला शासनाने मान्यता दिली आहे. त्यापोटी ७ हजार ७६६ कोटी ५५ लाख १३ हजार ४४० रुपये इतकी रक्कम बँकेला दिली असून, राष्ट्रीयीकृत बँकांनी ७ हजार ५८९ कोटी ९८ लाख २० हजार ८५७ रुपये इतकी रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप केली आहे. 

जिल्हा बँकेतील २६ लाख ६४ हजार ५७६ खात्यांवरील कर्ज मंजूर झाले असून, त्यापोटी ६ हजार ७७० कोटी १८ लाख ८८ हजार ७७२ रुपये जिल्हा बँकांना वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी जिल्हा बँकांनी ६ हजार ७९७ कोटी ७४ लाख ७८ हजार २९२ रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांना वाटप केली आहे. ३३ राष्ट्रीयीकृत आणि ३० जिल्हा बँकांतील ४६ लाख ५२ हजार ८१० कर्जखाती शासनाने मंजूर केली आहेत. त्यासाठी १४ हजार ५३६ कोटी ७४ लाख २ हजार २१३ रुपये इतकी रक्कम बँकांना दिली असून, बँकांनी १४ हजार ३८७ कोटी ७२ लाख ९९ हजार १५० रुपये इतकी कर्जमाफीची रक्कम लाभार्थ्यांना वाटप केली आहे. 

मुंबई उपनगरातून लक्षणीय अर्ज विशेष म्हणजे, सन २००८-०९ च्या कर्जमाफीप्रमाणे फडणवीस सरकारच्या कर्जमाफीसाठीसुद्धा मुंबई आणि उपनगरांतून कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. कर्जमाफीसाठी मुंबई उपनगरातून १ हजार ६२० आणि मुंबई शहरातील २३ हजार ७१५ जणांनी अर्ज केल्याचे सांगण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com