शेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच : माउली तुपे

शेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच
शेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच

पुणे  ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून, रचनात्मक काम काहीही नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत सरकारला गांभीर्यच नसल्याचा घरचा आहेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या भारतीय किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष माउली तुपे यांनी भाजप सरकारला दिला. तसेच सरकारने शेतकरीप्रश्‍नी वेळीच निर्णय घ्यावेत, अन्यथा आंदाेलनाचा भडका उडवू शकताे, असा इशाराही तुपे यांनी शुक्रवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत दिला. 

शेतकरी प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी साेमवारी (ता. २८) राज्यातील प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदाेलन करण्यात येणार असल्याचेही तुपे यांनी या वेळी सांगितले. श्री. तुपे म्हणाले, ‘सरकारचे साखर, दूध आणि वीजप्रश्नांबाबत ठाेस धाेरण नसल्याने शेतकऱ्यांना परिणाम भाेगावे लागत आहेत. शेती प्रश्‍नांबाबत सरकारचे दीर्घकालीन धाेरण नसल्याने सरकार तहान लागली की विहीर खाेदते अशी तऱ्हा सरकारची आहे. पेट्राेल डिझेलच्या दरवाढीबाबतही सरकारची अशीच अवस्था आहे. सरकारने हे विविध प्रश्‍न गांभीर्याने घ्यावेत; अन्यथा आंदाेलनांचा भडका उडवू शकताे. 

दुधाचे दर काेसळले असताना सरकारने धाेरण राबविण्याची गरज आहे. अंगणवाडी, शाळांना दूधपुरवठा करण्याचा निर्णय हा उशिरा सुचलेले शहाणपण आहे. तर ऊस दराबाबतही शेतकऱ्यांना दरवर्षी आंदाेलन करावे लागते. आंदाेलनामध्ये थातुरमातुर वाढ मिळते. म्हणून साखर आणि दूध दरप्रश्‍नी धाेरणात्मक निर्णय घेऊन दीर्घकालीन धाेरण राबवावे, अशी मागणी श्री. तुपे केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com