सरकारने जमिनींवर दरोडे टाकल्याने धर्मा पाटील यांची आत्महत्या

सरकारने जमिनींवर दरोडे टाकल्याने धर्मा पाटील यांची आत्महत्या

धुळे  ः सरकारने औष्णीक वीज प्रकल्पाच्या नावाने शिंदखेडा तालुक्‍यातील विखरण व परिसरात शेतकऱ्यांच्या जमिनींवर दरोडे टाकले. या दरोड्याचा बळी धर्मा पाटील ठरले असून, धर्मा पाटील यांच्यासारखी वेळ इतर शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी प्रकल्पांच्या नावाने केली जाणारी शेतऱ्यांची लूट बंद करावी, असे टीकास्त्र खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता.१) विखरण (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे आयोजित सभेत सोडले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी सन्मान अभियान मंगळवारी मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या विखरण गावातून सुरू झाले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, हंसराज वडगुले, उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष घनःश्‍याम चौधरी, गजानन भंगाळे, सचिन पाटील, वसंत पाटील, कमन पाटील, रत्नदीप पाटील आदी उपस्थित होते. 

विखरण येथे खासदार शेट्टी म्हणाले, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांना विखरण येथील सौर ऊर्जा प्रकल्पात नोकऱ्या मिळत नाहीत, पाण्याची व्यवस्था होत नाही व या प्रकल्पासंबंधीची आश्‍वासने सरकार पाळत नाही तोपर्यंत शेतकरी जमिनी देणार नाहीत. सरकारच्या अनास्थेमुळे धर्मा पाटील यांना जीव गमवावा लागला. अशी वेळ इतर शेतकऱ्यांवर यायला नको. यानंतर या अभियानातील सदस्य सायंकाळी शहादा (जि. नंदुरबार) येथे पोचले. शहादा येथील प्रेस मारुती मैदानावर सभा झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com