'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण जबाबदार'

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. कर्जमाफी केल्यानंतर सहाशे शेतकऱ्यांनी आपला जीव दिला. शेतमालाला, दुधाला दर नाही. याला केवळ सरकारचे चुकीचे धोरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. सरकार मात्र अपयश झाकण्यासाठी खोट्या जाहिराती देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (ता. २०) केला. याची सरकारला किंमत मोजावी लागेल, असेही ते म्हणाले. 

श्री. विखे म्हणाले, ‘देशात महिला, मुली, सामान्य जनता सुरक्षित नाही. रोज वेगवेगळ्या घटना घडत असताना पंतप्रधान परदेश दौरे करण्यात मश्‍गुल आहेत. कर्जमाफीनंतर तब्बल सहाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काही शेतकरी पंतप्रधान, सरकारमधील नेत्यांच्या नावे चिठ्ठ्या लिहून आत्महत्या करत आहेत. त्यामुळे कर्जमाफी तर फसली आहेच; सरकारला खरी कर्जमाफी द्यायची नाही, हेच यातून स्पष्ट होते, असेही श्री. विखे म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com