हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले

हतनूर धरण
हतनूर धरण

जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ व रावेर तालुक्‍यांच्या सीमेनजीकच्या तापी नदीवरील हातनूर धरणाचे चार दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत.मंगळवारी सायंकाळपर्यंत सहा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले होते. पण धरणात येणारा प्रवाह कमी झाल्याने दोन दरवाजे पूर्णतः बंद करून चार दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत.

जिल्ह्यात मागील १० ते १२ दिवसांपासून कुठेही जोरदार पाऊस बरसलेला नाही. पाऊस नसल्याने धरणांमधील पाणीसाठ्यातही फारशी वाढ झालेली नाही. परंतु हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने त्यात प्रवाही पाणी येतच आहे. ते ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी त्याचे दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. या धरणात सध्या ९८.३५ टक्के जलसाठा आहे.

जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव या तालुक्‍यांमधील अग्नावती, हिवरा, बहुळा, बोरी व मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य टक्‍के जलसाठा आहे. या भागात सुरवातीपासून जोरदार पाऊस नसल्याने या प्रकल्पांमधील साठा स्थिती कायम आहे.  त्यामुळे या भागात भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

जिल्ह्यातील रावेर, यावल तालुक्‍यांतील मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा स्थिती बरी आहे. अभोरा प्रकल्पात ७०.४४, सुकीमध्ये ७३.४४, मोरमध्ये ५०.६९ टक्‍के जलसाठा आहे. रावेरातील मंगरूळ प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.

प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची टक्केवारी ः गिरणा ६१.६९, वाघूर ६५.०८, तोंडापूर ६१.७१, अंजनी ४.२८. गिरणा व वाघूर प्रकल्पांमधील जलसाठा समाधानकारक असल्याने चाळीसगाव, जामनेर भागांतील काही गावांना पाण्याचा प्रश्‍न भेडसावणार नाही, अशी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com