पीकविमा परताव्यासाठीचे अन्नत्याग आंदोलन सुरू

परभणी ः पीकविमा परताव्यासाठी शेतकरी सुकाणू समितीतर्फे बुधवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले.
परभणी ः पीकविमा परताव्यासाठी शेतकरी सुकाणू समितीतर्फे बुधवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

परभणी  ः जिल्ह्यातील पीकविमा परताव्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवासांचे अन्नत्याग आंदोलन बुधवारी (ता. १८) सुरू करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र विमा कंपनीने अत्यंत तुटपुंजा विमा परतावा देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. जिल्ह्यातील असंख्य शेतकरी विमा परताव्यापासून वंचित राहिले आहेत.

राज्य सरकारने जबाबदारी घेऊन वंचित शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. १८) सुरू करण्यात आलेले अन्नत्याग आंदोलन गुरुवार (ता. १९) पर्यंत सुरू राहणार असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सहसचिव विलास बाबर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com