शेतकऱ्यांना न्याय मिळायवा हीच भूमिका : पटोले

खासदार नाना पटोले
खासदार नाना पटोले

अकोला : भारत हा कृषिप्रधान देश म्हटला जातो, मात्र सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची कायम चेष्टाच केली गेली. जर मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत असेल तर त्यात चुकीचे काय. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच आपली भूमिका असून यापुढेही राहील, असे स्पष्ट मत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मांडले.

शेतकरी जागर मंचतर्फे रविवारी (ता. २४) येथील खंडेलवाल भवनात शेतकरी संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, प्रशांत गावंडे, कृष्णा अंधारे, महादेवराव भुईभार, डॉ. हर्षवर्धन मालोकार, अविनाश नाकट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री. पटोले पुढे म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांची या हंगामात हजारो क्विंटल तूर विकली नाही. ज्यांनी विकली त्यांना पैसे मिळालेले नाहीत. सरकारने कर्जमाफी देताना त्यात अनेक जाचक अटी ठेवल्या. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या वाढल्या. जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून ही जर समस्या शासनदरबारी मांडण्याचा मी प्रयत्न करीत असेल तर त्याच चूक काय, असा सवाल श्री. पटोले यांनी उपस्थित केला.

तसेच देशातील शेतकरी व शेतीचा विकास करायचा असेल तर शासनाने शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडायला हवा, शेतमालाचे सर्मथनमूल्य वाढले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मतभेद बाजूला सारून एकत्र आले पाहिजे. लढा द्यायला हवा. शेतकरी आत्महत्या करीत असताना कृषिमंत्र्यांनी सक्रिय असायला हवे. परंतु राज्याप्रमाणेच केंद्रातील कृषिमंत्री केवळ नावालाच असल्याचा आरोप श्री. पटोले यांनी केला. या कार्यक्रमाचे संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com