आमदार-खासदारांची धोरणे व्यापारीहिताची

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन केलेल्या व्यापारीहिताच्या धोरणांमुळे; तसेच शेतकरीविरोधी कट कारस्थांनामुळे शेतकऱ्यांचे बळी जात आहेत. त्यामुळे अशा आमदार-खासदारांना फाशी द्यायला पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी (ता. १८) केली. 

एकीकडे खुल्या अर्थव्यस्थेचा डिंडोरा पिटला जातो; तर दुसरीकडे निर्यातबंदी केली जाते. शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव दिला जात आहे. यामुळे आर्थिक कोंडी होत असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. याच्या निषेधार्थ १४ मे रोजी राज्यव्यापी जेल भरो आंदोलन केले जाणार असल्याचे रघुनाथदादा यांनी सांगितले. शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीतर्फे काढण्यात आलेल्या हुतात्मा अभिवादन यात्रेनिमित्त परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कालिदास आपेट, सुभाष काकुस्ते, जिल्हाध्यक्ष बंडू सोळंके आदी उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले की, शेतकरी आत्महत्या हा पुरोगामी महाराष्ट्रावरील कलंक आहे. सरकार आणि विरोधक एकमेकांना दोष देण्याचे काम करत आहेत. राजकारणाच्या खेळात शेतकऱ्यांचा जीव जात आहे. उद्योजकांना कच्चा माल, कामगार स्वस्त दरात मिळाले पाहिजेत अशी धोरणे राबविली जात आहेत. त्यामुळे आमदार-खासदार हे संघटित गुन्हेगार आहेत. त्यांना फाशी दिली पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक यांचा वाटून खायचा धंदा आहे. त्यांना शेतकरी कर्जमाफीसाठी फक्त झुलवत ठेवायचे असल्याची टीका रघुनाथदादा यांनी केली. तसेच अटी, शर्तीमुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचे ते म्हणाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com