प्रलंबित कृषिपंपांना २०१९ पर्यंत वीजजोडण्या देणार ः बावनकुळे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्यातील २ लाख ३९ हजार प्रलंबित वीजजोडण्या डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण केल्या जातील. एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर अशी योजना तयार करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार (ता. ८) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

श्री. बावनकुळे म्हणाले, राज्यात तीन वर्षांत ४ लाख ५२ हजार ८५२ कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. सध्या २ लाख ३९ हजार ३६१ विजेचे पेड पेंडिंग असून, ती २०१९ पर्यंत जोडली जातील. पंजाब आणि गुजरातच्या धर्तीवर राज्यात एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर ही योजना सुरू करण्याचे विचाराधीन आहे. या योजनेतून पुढील १० वर्षांत ४५ लाख कृषिपंपाना जोडण्या देण्यात येतील. वीजजोडणीसाठी आधुनिकीकरणाची गरज आहे.

राज्यात मुख्यमंत्री सौरवाहिनी योजना सुरू असून त्यामाध्यमातून कृषिपंपांना सौरऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी बैठक घेऊन या प्रकल्पासाठी १० एकर जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून तेथे २ मेगावॉटचा प्रकल्प सुरू करण्यात येईल. यामुळे शेतीला १२ तास वीज मिळणे शक्य होणार असेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com