जागेअभावी तूर-हरभरा खरेदी बंद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव जामोद,जि. बुलडाणा  : शासनाने नाफेड अंतर्गत सुरू केलेली तूर - हरभरा खरेदीचा तूर्तास पुर्णता बोऱ्या वाजला असून खोदा पहाड निकला चुहा अशीच अवस्था झाली असल्याचे चित्र आहे. जळगाव जामोद येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये साडेसात हजार क्विंटल तूर, हरभरा पडून असल्याने खरेदी विक्री संस्थेस जागे अभावी पुढील खरेदी तूर्तास बंद करावी लागली आहे.  

शासकीय धोरणानुसार येत्या १५ मे पर्यंत तूर खरेदी चालु राहणार असली तरी आजपर्यंत केवळ २८०० शेतकऱ्यांचेच तुरीचे मोजमाप झाले असून तूर व हरभरा मोजमापासाठी असुन सुमारे पाऊनेसात हजार शेतकरी प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे.

तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेकडे आजवर ७८०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असून केवळ २८०० शेतकऱ्यांचे मोजमाप आजवर झाले आहे. ५००० तूर उत्पादक शेतकऱ्यांची तुर अद्यापही घरातच पडून आहे. मोजमाप झालेली ४००० क्विंटल तुर व ३३०० क्विंटल हरभरा असा ७३०० क्विंटलचा साठा मार्केट यार्डमध्ये टीनशेड मध्ये पडून आहे. टीन शेड चारही बाजूने उघडी असल्याने येणाऱ्या पावसापासून मालास धोका संभवतो. जास्तीचे वाहने लावून हा तुर - हरभरा साठा नाफेडने गोडावून मध्ये इतरत्र न्यायला हवा. मात्र, या साठ्याची उचल नाफेडकडून संथ गतीने सुरू आहे. हा ७३०० क्विंटल माल उचल्याशिवाय नवीन तूर - हरभरा खरेदी करणे शक्‍यच नाही. 

गत महिन्यात हरभरा खरेदी केंद्रावरील हरभऱ्यास आग लागून ४० हजारापेक्षा जास्त नुकसान झाले होते. टीनशेड चहू बाजूनी ओपन आहेत. त्यामुळे भविष्यात सुध्दा आगीची शक्‍यता नाकारता येत नाही. तालुका शेतकी संस्था संचालक, कर्मचारी हे हरभरा - तूर खरेदीत काळजीपुर्वक लक्ष घालुन आहेत. परंतु शासकीय यंत्रणा महसूल विभाग, सहकार विभागाचे याकडे लक्ष नसून तूर - हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. येथील नाफेड केंद्रावर आतापर्यंत २००० शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीची पुर्व नोंदणी केली असून फक्त २२५ शेतकऱ्यांचेच मोजमाप झाले आहे. एकाही हरभरा विक्रेत्या शेतकऱ्याला अजून पैसे मिळाले नाहीत. तूर विक्री केलेल्या पहिल्या २०३० शेतकऱ्यांना फक्त पैसे मिळाले असून ५०० शेतकरी पैशांच्या प्रतिक्षेत आहेत.

मोजमाप होताच चुकारे चार दिवसात संबंधीत शेतकऱ्यांचे खात्यात जमा करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या पणन मंत्री सुभाष देशमुखांच्या आश्‍वासनाला पण प्रशासन हरताळ फासत आहे. 

शासनाने तूर आणि हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची पूर्व नोंदणी करून घेतली होती. त्यामुळे आवक किती होईल याचा शासनास पूर्व अंदाज होता. त्यानुसार शासनाने गोडावून उपलब्ध ठेवायला हवे होते. परंतु तसे न केल्याने खरेदी केलेला साठा, खरेदी केंद्रावर पडून आहे.  

- प्रसेनजित पाटील,  सभापती बाजार समिती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com