राणे, जावडेकर, केतकर राज्यसभेवर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी शेवटपर्यंत सहाच उमेदवार राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी गुरुवारी (ता. १५) भाजपच्या विजया रहाटकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.

राज्यसभेसाठी माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. राणे यांच्यासह भाजपचे केरळमधील नेते व्ही. मुरलीधरन आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीसुद्धा अर्ज भरला होता. काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, राष्ट्रवादीने वंदना चव्हाण आणि शिवसेनेने अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या रूपाने चौथा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची मंगळवारी छाननी झाली. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. छाननीनंतर १५ मार्च ही अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. यामध्ये विजया रहाटकर यांचा उमेदवारी अर्ज भाजपने मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सहा जागांसाठी सहाच अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.

भाजप : प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन शिवसेना : अनिल देसाई काँग्रेस : कुमार केतकर राष्ट्रवादी काँग्रेस : वंदना चव्हाण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com