कृषिपंपांच्या वीजदरवाढीविरोधात विधिमंडळावर मोर्चा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  ः कृषिपंपांच्या वीजदरवाढीविरोधात येत्या मंगळवारी (२७ मार्च) विधिमंडळावर राज्यातील लाखो शेतकरी धडक देणार आहेत. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. 

मोर्चानंतरही सरकारने दखल घेतली नाही, तर शेतकरी जुन्या दरानेही वीज बिले भरणे बंद करतील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. महावितरण कंपनीने शेतीपंपाच्या वीज दरात १ रुपया १६ पैशांवरून १ रुपया ९७ पैसे इतकी दरवाढ केली. याविरोधात कोल्हापूर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून मंत्रालयाला मानवी साखळी घालण्याचा इशारा दिला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७ जानेवारीला चर्चा करण्याची वेळ दिली; पण त्यादिवशी चर्चा झालीच नाही. त्यानंतर २७ फेब्रुवारीपर्यंत वेळ दिली, पण तीही तारीख होऊन गेल्याने आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही १.१६ रुपये दराने वीज बिल भरत आहोत. यंदा अभूतपूर्व उन्हाळा राहणार आहे, अशा परिस्थितीत वीज तोडली तर पिके वाळून जातील, असे प्रा. पाटील यांनी स्पष्ट केले. 

राज्य सरकार दखल घेणार नसेल तर २७ मार्चला विधिमंडळावर राज्यातील शेतकरी धडक देतील. वेळप्रसंगी दोन दिवस त्याठिकाणी ठिय्या मारण्याची आमची तयारी असून जुल्मी दरवाढ मागे घ्यावीच लागेल. मुख्यमंत्र्यांनी कृषी संजीवनी योजना सुरू केली, पण ती पुरती फसवी आहे. ‘महावितरण’ने १४० ते २७४ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढ केल्याने पोकळ थकबाकी वाढली आहे. त्यावर कृषी संजीवनी योजना लागू करणे चुकीचे आहे. त्यामुळे ही योजना फसली असून सात लाख शेतकऱ्यांनी ३६१ कोटींची वसुली झाली आहे. म्हणजे एकूण थकबाकीच्या ३.३ टक्के वसुली झाल्याचे वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com