कर्जमाफीसाठी मराठवाड्यात २९ लाख ६३ हजार नोंदणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत १६ सप्टेंबरपर्यंत २९ लाख ६३ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आठही जिल्ह्यांत १५ लाख ४९ हजार ८४७ लाभार्थी अर्ज दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत कर्जमाफीसाठीच्या अर्जांची संख्या जवळपास निम्मीच आहे. त्यामुळे यामध्ये नेमक्‍या अडचणी काय हे समजायला मार्ग नाही. १६ सप्टेंबरपर्यंत राज्यभरातून कर्जमाफीसाठी एक कोटीवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तर ५२ लाख ८५ हजार ६६४ शेतकऱ्यांचेच लाभार्थी अर्ज आले होते.

दरम्यान योजनेसाठी अर्ज करण्यास आठवडाभराची मुदतवाढ मिळाली. त्यामुळे कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची सोय झाली. सोबतच योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन व प्रशासनाने उशिराने स्थापन केलेल्या समित्यांना यामाधील अडचणींवर प्रत्यक्ष अनुभवातून कामाची संधी मिळाली. याविषयीच्या अडचणी शेतकऱ्यांना थेट समित्यांकडे मांडून त्या अडचणींची सोडवणूक करून घेता येणार आहे.

वीज भारनियमनाचा खोडा शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर ग्रामीण भागातील सुविधा केंद्रांमधून अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची सर्व्हर डाउनची समस्या तूर्त सुटली, तरी वीजपुरवठा खंडित होत असल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातीलच रजापूर, देवगाव, डाभरूळ शिवारातील गावांमध्ये शनिवारी सकाळी बंद झालेला वीजपुरवठा तब्बल ३६ तासांनंतर सुरळीत झाला. त्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्याच्या कामात व्यत्यय येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com