साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९३ टक्‍क्‍यांवर पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे धरणातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणांत ९३ टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे. पाणीपातळी नियंत्रित राहण्यासाठी चार धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. 

राज्याच्या वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात १०४.८३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण ९९.५९ टक्के भरले आहे. सध्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. 

सध्या धरणाच्या दरवाजांतून १४,१३४ व पायथा वीजगृहातून २१०० असे एकूण १६,२३४ क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. जिल्ह्यात पाणी क्षमतेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धोम धरणात ९३.३५ टक्के पाणीसाठा झाला आहे. तुलनेत या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे.

उरमोडी धरण दुष्काळी तालुक्‍यांसाठी महत्त्वाचे धरण असून, या धरणात ९६.८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. कण्हेर धरणात ९८.३६ टक्के भरले असून, या धरणातून २४९४ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

धोम-बलकवडी धरणात ९९.३८ टक्के पाणीसाठा झाला असून, धरणातून १४०० क्‍युसेक पाणी सोडले जात आहे. तारळी धरणात ९३.६२ टक्के पाणीसाठा झाला असून, या धरणातून १२७५ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com