ग्रीन रिफायनरी ठेवणार की घालवणार?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांप्रमाणे शिवसेनेचा असणारा विरोध लक्षात घेता नाणारचा वादग्रस्त प्रकल्प राहणार की घालवणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारला केला. नाणारच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार अधिवेशन संपण्यापूर्वी नाणारवर अर्धातास चर्चा लावावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.

उद्योग, ऊर्जा, कामगार, ग्रामविकास, नियोजन विभागाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना जयंत पाटील यांनी नाणारच्या मुद्याला हात घातला. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

नाणार प्रकल्पावर चर्चा घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. परंतु, चर्चा घेतली तर शिवसेनेचा रोष पत्करावा लागेल म्हणून सरकार घाबरलेले दिसते. कोकणातील जागृत जनतेने प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी नाणावर चर्चा घ्यावी. ही चर्चा झाली नाही तर प्रकल्पाच्यासंदर्भात स्थानिकांच्या मनात असलेली भीती खरी करण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत हे स्पष्ट होईल, असेही पाटील म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com