सिंचन प्रकल्पाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : गेल्या चार वर्षांपासून राज्य अवर्षण आणि दुष्काळाला तोंड देत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या गंभीर समस्येशी लढण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सिंचन प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावेत, असे निर्देश केंद्रीय रस्ते व परिवहन, जहाजबांधणी, जलसंसाधनमंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

सुरेश भट सभागृहात पंतप्रधान कृषी सिंचन योजना व बळिराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत प्रकल्पाचा आढावा व एकदिवसीय कार्यशाळा गडकरी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यामध्ये खुली चर्चा होऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या व त्यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. केंद्र शासनाने आत्महत्याग्रस्त भागातील विदर्भ ७८ व मराठवाड्यातील २६ असे एकूण १०४ सिंचन प्रकल्प तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळप्रवण भागातील ८ प्रकल्प असे एकूण ११२ प्रकल्प पूर्ण करण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे.

येत्या काळात धडक मोहीम आखून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरावरून योग्य नियोजन करून वेळेत प्रकल्प पूर्ण करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com