पीककर्ज वाटपात गोंधळच

पीककर्ज वाटपात गोंधळच
पीककर्ज वाटपात गोंधळच

अकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण वाटणार नाही, मात्र त्याला एखाद्या कामासाठी लागणारा कागद अधिकाऱ्याकडून काढायचा असेल तर ते काम सर्वाधिक तापदायक वाटत असते. सध्या खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटप सुरू अाहे. पीककर्ज काढण्यासाठी अर्ज, अर्जासोबत जोडायची कागदपत्रे या सर्वांबाबत संभ्रम तयार झालेला अाहे.        अालेगाव (ता. पातूर) येथील एका बँक शाखेत फारशी गर्दी नव्हती. दैनंदिन व्यवहार, निराधार खात्यातील पैसे काढणारे ये-जा करीत होते. एखाद-दुसरा शेतकरी येत होता. कुणी पीककर्जाची फाइल घेऊन तर कुणी पिकविमा अाला का हे विचारत होता... दशरथ शेळके नावाचे शेतकरी याच ठिकाणी भेटले. घरी दहा एकर शेती. त्यातील एका एकरात सिंचन होईल इतकेच पाणी सध्या त्यांच्याकडे अाहे. त्यांनी २०१६-१७ मध्ये पीककर्ज घेतले होते. पण ते माफ झाले किंवा नाही याची अद्याप काहीच माहिती त्यांना मिळालेली नाही. 

अालेगावपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर त्यांचे गाव अाहे. येथून सकाळीच ते अाले होते. गेली दोनवर्षे सोयाबीन, हरभरा पिकला; मात्र भाव नसल्याने पीक परवडले नाही. अाता यावर्षी पेरायचे, तर पैसा नाही. बँकेत तिसऱ्यांदा अालो असल्याचे ते म्हणाले. कर्जमाफीबाबत माहिती मिळाली, तर नवीन पीककर्जासाठी कागदपत्रे जमवू असे ते म्हणाले. शेळकेंप्रमाणे बरेच शेतकरी बँकेत येत होते व चौकशी करून जात होते. प्रत्येकाला कागदपत्रांची जुळवाजुळव करताना नाकीनऊ अालेले अाहेत, हे स्पष्ट जाणवत होते.

वाडेगाव येथे लाहोकार नावाचा तरुण शेतकरी भेटला. पहिल्यांदाच पीककर्ज घेत होता. अामचे एकत्र कुटुंब असून काही जमीन अाईच्या व काही माझ्या नावे अाहे. अाता पीककर्ज घ्यायला अालो तर बँकांनी १३ प्रकारचे कागदपत्रे मागितली. यासाठी एक कागद पातूर, एक बाळापूर अाणि एक अकोल्यातून अाणावा लागला. एवढे करूनही एकाच कुटुंबाची जमीन असताना अाईकडून ना हरकत प्रमाणपत्र बाँडवर बँकेला लिहून हवे अाहे. गेले १५ दिवस या कागदपत्रांसाठी अधिकारी, बँक शाखांकडे चकरा मारल्या. तरीही पीककर्जाचे प्रकरण फायनल झाले नाही. 

शेतकरी असल्याचे पत्र दिले तर चार्ज टळू शकतो सध्या शेतकऱ्यांना विविध कागदपत्रे जमावी लागतात. त्यात नो ड्युज हे सर्वांत महत्त्वाचे असते. प्रत्येक बँक हे प्रमाणपत्र देण्यासाठी काही चार्ज अाकारते. यासाठी जवळपास ८०० ते १००० रुपयांचा खर्च शेतकऱ्याला लागत अाहे. याबाबत संबंधित व्यक्ती शेतकरी अाहे असे पत्र सोसायटीने लिहून दिले तर हा चार्ज बँका टाळू शकतात, असे बँक व्यवस्थापकाचे म्हणणे होते. पीककर्ज वाटपाची गती संथ कशामुळे अाहे हे विचारले असता, शेतकऱ्यांकडून परिपूर्ण कागदपत्रांची फाइल अाली तर पीककर्ज द्यायला काहीही विलंब होत नाही, असे व्यवस्थापक सांगत अापली बाजू सावरत होते.

बँकेच्या अाले मना...! पातूर तालुक्यातील सस्ती या गावात स्टेट बँकेत काही खातेदार, शेतकरी बसलेले होते. दुपारची वेळ असल्याने बँकेचे गेट मात्र बंद झालेले होते. कार्यालयीन वेळ संपलेली नसताना व बुधवारी कुठलीही सुटी जाहीर झालेली नसताना या बँक शाखेने व्यवहार बंद ठेवलेले होते, जबाबदार कुणीही बोलत नव्हता. थोड्याच वेळात तेथून वाडेगाव गाठले. कार्यालयीन कामकाजाची वेळ संपायला अद्याप दोन ते अडीच तास शिल्लक होते. मात्र, याही गावात स्टेटबँकेच्या शाखेत भेट दिली, तर बँक बंद असल्याचा फलक गेटजवळच झळकलेला दिसून अाला. येथेही शेतकरी व खातेदार येत अाणि बँक बंद असल्याचे पाहून निघून जात. मुळात पीककर्ज वाटपाचा मोसम असताना बँक मात्र कुठल्याही ठोस कारणाशिवाय अापल्याच पद्धतीने कामकाज करीत असल्याचे याठिकाणी शेतकरी सर्रास बोलत होते. ‘बँकेच्या अाले मना, तेथे कुणाचे चालेना ! असा हा प्रकार होता.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com