अमृताताई आमचंही सौभाग्य जपा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ : अमृताताई आमच्या जिल्ह्यात दारूबंदी करून आमचंही सौभाग्य जपा, अशी भावनिक साद यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पत्राद्वारे घातली आहे. स्वामिनी दारूबंदी संघटनेच्या पुढाकारात जिल्ह्यातील १६ तालुक्‍यांत एक लाखावर असे पत्र अमृता फडणवीस यांना पाठविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अनेक काही संसारही उद्‌ध्वस्त झाले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, अशी मागणी महिलांची आहे. यासाठी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला. अनेकदा आंदोलनही करण्यात आले. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला पत्र लिहून याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

काय आहे पत्रात? आदरणीय अमृता फडणवीस, पत्र लिहण्याचे कारण, यवतमाळ जिल्ह्यातील आमच्या घरात, दारात दारूने थैमान घातले आहे. माझ्या हजारो बहिणी या दारूमुळे विधवा झाल्या आहेत. तुझ्याचसारखे अखंड सौभाग्यवती राहण्याची माझी इच्छा आहे, पण ही दारू माझे सौभाग्य केव्हा हिरावून घेईल याची काही खात्री उरली नाही. राज्याचे मुख्यमंत्री असलेले तुझे पती यांना सांगून आमच्या जिल्ह्याची दारूबंदी करून घे व तुझ्यासारखे अखंड सौभाग्य आम्हास मिळू दे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com