मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (रविवार) पार पडला. त्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाले. यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांना गृहनिर्माण तर अनिल बोंडे यांना कृषिमंत्रिपद देण्यात आले. तर आशिष शेलार यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाकडून अविनाश महातेकर यांच्यासह तेरा जणांनी मंत्री आणि राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज सकाळी अकरा वाजता नव्या मंत्र्यांना शपथ दिली. शिवसेना-भाजपचे मिळून एकूण 13 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीआधी होणारा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार आहे.
यामध्ये तानाजी सावंत यांना जलसंधारण, सुरेश खाडे यांना सामाजिक न्याय मंत्रिपद देण्यात आले आहे. तर जयकुमार रावल यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्रिपद देण्यात आले.
मंत्रिमंडळ खातेवाटप पुढीलप्रमाणे : कॅबिनेट मंत्री
राज्यमंत्री
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.