सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली भरः अनिल देशमुख 

अनिल देशमुख
अनिल देशमुख

नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या लाभापासूनही शेतकरी वंचित आहेत, पीकविम्याचा लाभ देण्यातही सरकार असमर्थ ठरले. आता पीककर्जाच्या उद्दिष्टात कपात करून शेतकऱ्यांच्या समस्यात भर टाकण्याचे काम सरकारने केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. नागूपर जिल्ह्यात मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येते. परंतु सध्या ही बॅंक डबघाईस आली आहे. यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांचा एकमेव आधार शेतकऱ्यांना उरला आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आपली कर्ज वितरणाची प्रक्रिया नाहक किचकट करून ठेवली आहे. आवश्‍यकता नसतानाही विविध कागदपत्रांची मागणी त्यांच्याकडून केली जाते. यामुळे हवालदील झालेला शेतकरी खासगी सावकारांकडे जातो. असे असताना बॅंकांच्या अपयशाचे खापर नाबार्डने शेतकऱ्यांवर फोडत या वर्षी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट कमी केले आहे. अशीच परिस्थिती विदर्भातील इतर जिल्ह्यात आहे. पीककर्ज वाटपाबाबत गेल्या वर्षी देखील उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले. ते पूर्ण करण्यात बॅंका अपयशी ठरल्या, त्यामुळे देखील पीककर्ज उद्दिष्ट या वर्षी कमी केल्याचे सांगीतले जाते, असेही अनिल देशमुख यांनी प्रसद्धी पत्रकात म्हटले आहे. या वर्षीची परिस्थिती लक्षात घेता या वर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक राहणार आहे. कर्ज जर वेळेवर मिळाले नाही तर शेती पडीक राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा होण्यासाठी तालुकास्तरावर कर्ज मेळावे घेण्यात यावे. कर्जमेळाव्यांसाठी नियोजन करावे, परंतु याकडेही राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com