सरकारला शेतकऱ्यांची नाही, उद्योगपतींची चिंता : हजारे

सरकारला शेतकऱ्यांची नाही, उद्योगपतींची चिंता : हजारे
सरकारला शेतकऱ्यांची नाही, उद्योगपतींची चिंता : हजारे

सातारा : कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारला उद्योगपतींची चिंता आहे, शेतकऱ्यांची नाही, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केला. मी शेतकऱ्यांसाठी देशभर फिरत असून, शेती मालाला खर्चावर आधारित हमीभाव मिळालाच पाहिजे, त्यासाठी २३ मार्चला दिल्लीत आंदोलन करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कोरेगाव (जि. सातारा) येथे भारतीय जनसंसद संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) आयोजित जाहीर सभेत अण्णा हजारे बोलत होते. ते म्हणाले, की संपूर्ण भारतभर माझे दौरे सुरू आहेत. ओडिशापासून सुरवात केली. या सभा निवडणूक लढण्यासाठी मते मागण्यासाठी नाहीत. कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, या सरकारला उद्योगपतींची चिंता आहे, शेतकऱ्यांची नाही. स्वातंत्र्यानंतर किती उद्योगपतींच्या आत्महत्या झाल्या. म्हणून देशभर मी फिरतोय ते आम्ही शेतकऱ्यांना शेतीमालाला खर्चावर आधारित हमीभाव मिळवा. त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. श्री. हजारे म्हणाले, की कृषिमूल्य आयोग निर्माण केला आहे, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी सर्व पिकांचा भाव काढून तो केंद्राला पाठवतात, तेथे एसीमध्ये बसून ४० ते ५० टक्के कपात करून शेतीमूल्य ठरवतात. तुम्हाला हा अधिकार कुठून आला. शेतीचे बजेट वाढवत नाहीत. पण उद्योगावरील बजेट वाढत आहे. शेतीचा विकास होत नाही, बॅंक शेतकऱ्याला कर्ज देत नाही, दिले तर चक्रवाढ व्याज लावतात. म्हणून सर्वोच न्यायालयाने आदेश केले आहेत, चक्रवाढ व्याज लावू नका, पण कोणी लक्ष देत नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com