राज्यात तरी लोकायुक्तांची नियुक्ती करा ः हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

नगर   : ‘लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी कराल अशी अपेक्षा होती पण...’ अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी (ता. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हतबलता व्यक्त केली. लोकपाल व लोकायुक्त कायद्याप्रमाणे विधानसभेत चर्चा करून लोकायुक्त अधिनियम ४ (३) प्रमाणे संशोधन समिती नेमून आपल्या राज्यात तरी लोकायुक्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.  

केंद्र सरकारनेही लोकपाल कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. निवडणुकीपूर्वी लोकायुक्तांची नेमणूक करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सांगितले होते, असे नमूद करून हजारे यांनी, याच कारणासाठी नाइलाजास्तव मी ३० जानेवारीपासून उपोषण सुरू करत आहे, असे पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनाही हजारे यांनी पत्र पाठवून, सरकार खोटारडे असल्याचा आरोप केला आहे. हजारे यांना नुकतेच पंतप्रधान कार्यालयाचे पत्र मिळाले. त्याला उत्तर देताना हजारे यांनी म्हटले आहे, की लोकपाल कायदा होऊन पाच वर्षे होत आहेत. मात्र, सरकारला त्याची अंमलबजावणी जमली नाही. हा कायदा कमकुवत करणारा कायदा मात्र २०१६ मध्येच केला. त्यावरून सरकारचा खोटारडेपणा उघड होत आहे. शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव आणि कृषिमूल्य आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चारही हजारे यांनी या पत्रात केला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com