'पहिली उचल ३४०० रुपये जाहीर करा'

सातारा ः ऊसदराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. (छायाचित्र ः प्रमोद इंगळे)
सातारा ः ऊसदराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. (छायाचित्र ः प्रमोद इंगळे)

सातारा : या वर्षीची पहिली उचल ३४०० रुपये प्रतिटनप्रमाणे जाहीर करावी, मगच जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस तोडणी सुरू करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्याकडे केली आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव साळुंखे आणि सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. ३१) उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.

निवेदनात संघटनेने म्हटले, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील १६ व्या ऊस परिषदेत या वर्षी गाळपास येणाऱ्या उसाला पहिली उचल ३४०० रुपये प्रतिटनप्रमाणे घेण्याचा ठराव झाला. सध्या जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखाने मोळी टाकून सुरू झाले आहेत.

त्यामुळे तोडणी कामगार ऊस तोडीसाठी सज्ज आहेत; पण ऊस दराची पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखान्यांनी ऊस गाळप तसेच ऊस तोडणी करू नये, असे आदेश द्यावेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com