ओखी वादळग्रस्तांना नुकसानभरपाईची घोषणा

ओखी वादळग्रस्तांना नुकसानभरपाईची घोषणा

नागपूर : ओखी वादळामुळे झालेल्या कोरडवाहू शेतकरी, फळ बागायतदार, बागायती शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा महसूल, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता. २०) विधान परिषदेत केली. कोरडवाहू शेतीसाठी सहा हजार ८०० प्रतिहेक्‍टर, बागायतीसाठी १३ हजार ५०० प्रतिहेक्‍टर, फळबागायतदारांना १८ हजारांची प्रतिहेक्‍टर मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

ओखी वादळामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मदत व पुनर्वसनमंत्री म्हणाले, गेल्या तीन वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची मदत केलेली आहे. ओखीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. ज्या ठिकाणी पंचनामे योग्य पद्धतीने होत नसतील, तर त्याची दखल घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com