गारपीटग्रस्तांना घोषणा नको, तत्काळ मदत द्यावी ः अशोक चव्हाण

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

पूर्णा, जि. परभणी : गारपीटग्रस्तांना मदत देण्याची केवळ घोषणा करून उपयोग नाही. या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करून सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. १३) केली. खासदार चव्हाण यांनी पूर्णा तालुक्यातील चुडावा आणि नऱ्हापूर या गावांच्या शिवारात सोमवारी (ता. १२) दुपारी वादळी वारे, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. या वेळी ते बोलत होते. श्री. चव्हाण पुढे म्हणाले, की राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नुसत्या घोषणा करत आहे. परंतु त्यांची अंमलबजावणी मात्र समाधानकारक नाही. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निर्सगाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सोबतच कर्जमाफीदेखील देणे आवश्यक आहे.  या वेळी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे, डी. पी. सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे आदींसह शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.  दरम्यान, श्री. चव्हाण यांनी सोमवारी गारपिटीत सापडून मृत्यू झालेल्या भगीरथीबाई पांडुरंग कांबळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com